सुप्रसिद्ध भजन गायिका जया किशोरीने ठेवली लग्नासाठी ही अट; अट ऐकून व्हाल थक्क….

भारतासह जगभरात प्रसिद्ध असणारी किर्तनकार आणि भजन गायिका जया किशोरी लवकरच लग्न बंधनात अडकरणार असल्याचे समजत आहे. मात्र त्यांनी लगाची जी अट ठेवली आहे ती ऐकून सगळीच थक्क झाले आहेत.  (Famous kirtan singer and bhajan singer Jaya Kishori’s marriage condition is that her parents will also live with her)

भारतामध्ये नाही तर आता प्रदेशामध्ये देखील कीर्तन आणि भजन तितकाच प्रसिद्ध झालं आहे. त्यामुळे प्रसिद्ध  किर्तनकार आणि  गायिका जया किशोरी सर्वत्र प्रसिद्ध झाल्या आहेत. सुरुवातीपासूनच त्यांना आध्यात्माची आवड राहिली आहे.

जया किशोरी या एक उत्तम भजन गायिका, प्रसिद्ध किर्तनकार आणि आणि प्रेरक वक्त्या म्हणून ओळखल्या जातात जया किशोरी यांचे खरे नाव जया शर्मा असे आहे. परंतु सर्वत्र त्यांना जया किशोरी म्हणून ओळखले जाते.

मिळालेल्या माहितीनुसार, वयाच्या अवघ्या 9व्या वर्षापासून जया किशोरी यांनी अध्यात्माला सुरुवात केली होती. जया कथांचे कार्यक्रम जसे कि भागवत गीता, नानीबाई रो मायरो, रामायण देखील करतात. लोकांना त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घ्यायचं आहे.

त्यामुळे सोशल मीडियावर अनेक लोक जया किशोरीच्या लग्नाबद्दल, ते कधी होणार आहे? कसे होणार? कोणासोबत होणार? असे प्रश्न विचारत आहेत.

13 जुलै 1995 रोजी जया किशोरी यांचा जन्म सुजानगढ, चुरू, राजस्थान येथे झाला आहे. तसेच त्यांनी खूप कमी वयामध्ये यशाचे शिखर गाठले आहे. त्या एक प्रसिद्ध भजन आणि कीर्तन गायका म्हणून ओळखल्या जातात. त्यांचे भजन ऐकण्यासाठी लोक लोखोंच्या संख्येत गर्दी करतात. याचसोबत त्यांचे चाहते सोशल मीडियावर देखील पाहिला मिळतात. यूट्यूबवर त्यांचे भजन आणि कथांचे अनेक व्हिडिओ आहेत.

जया किशोरी यांची भगवान विष्णूवर खूप श्रद्धा आहे. वयाच्या अवघ्या  9 व्या वर्षापासून जया किशोरी यांनी संस्कृतमधील लिंगाष्टकम्, शिव तांडव स्तोम यासारखे कठीण स्रोत गायला सुरुवात केली होती. त्यामुळे त्यांना लोकांनी ऋषी-संत ही पदवी दिली आहे. मात्र जया किशोरी स्वतःला साध्वी मानत नाहीत. कारण त्या एक सामान्य मुलगी असल्याचे सगळ्यांना सांगतात.

जया किशोरी यांनी सांगितलं आहे कि, जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा त्या नक्कीच लग्न करतील. मात्र  त्यानंतर त्या भक्तीचा मार्ग कधी सोडणार नाहीत. नुकतीच जया किशोरी यांनी एक मुलाखत दिली होती. तेव्हा त्यांना त्यांच्या लग्नाबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता.

लग्नाबद्दल उत्तर देत  जया किशोरी म्हणाल्या कि, कोलकात्यामधील मुलगासोबत लग्न झालं तर  उत्तमच. ज्यामुळे माहेरी येण जण सोपं राहील.  जया किशोरी त्यांच्या कुटुंबीयांसोबत कोलकाता मध्ये राहत आहेत.

मुलाखतीत लग्नाची अट सांगत जया  किशोरी म्हणाल्या कि, मी बाहेर कुठे लग्न केले तर माझे आई-वडीलही माझ्यासोबत  तिथे शिफ्ट होतील. त्यांचे लग्न जिथे कुठे होईल त्या तिथे त्यांच्या पालकांना घर घेऊन देतील.

यावरून लक्षात येते कि, जया यांचे त्यांच्या पालकांवरून खूप प्रेम आहे. त्यामुळे त्यांना त्यांच्यापासून लांब राहीचे नाही. जया असे देखील म्हणल्या होत्या कि, त्या मुलगी असल्यामुळे खूप घाबरतात कारण त्यांना एक ना एक दिवस लग्न करून घर सोडावे लागेल. यासोबत त्या म्हणाल्या कि, पालकांशिवाय राहण्याच्या कल्पनेनेच त्यांना भीती वाटते. त्यामुळे त्यांना त्यांच्या पालकांसोबतच राहीच आहे.

Leave a Comment