नवा गडी नवं राज्य मालिकेतील टग्याचे पात्र साकारणाऱ्या बालकलाकार नेमका आहे तरी कोण?

अनेक मराठी मालिकांमध्ये माळीवाणी भाषेचं वापर केल्याचे पाहिला मिळत आहे. त्यामुळे लोक भाषेचा गोडवा पाहून मालिकेला खूप प्रेम देताना दिसतात. ज्यामुळे लोकांचे वेगळंच मनोरंजन होते. सध्या अशीच एक मालवणी भाषा असणानारी मालिका खूप प्रसिद्ध होता आहे. या मालिकेमधेल एका बाल कलाकारांबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.  (Know about the child actor Sripad Padwal who played the character of Tagya in the serial Nava Gadi Nava Rajya)

नवा गडी नवं राज्य हे मालिका खूप लोक प्रिय झाली आहे. तसेच या मालिकेमधील कलाकार देखील खूप प्रसिद्ध झाले आहेत. यातील टग्याच्या पत्राने प्रेक्षकांना वेड लावलं आहे. मात्र हा टिग्या आता सीरियलच्या सेटवर चिंगीला मालवणी भाषा शिकवताना ही दिसत आहे. मालिकेमध्ये जेव्हा जेव्हा टग्या दिसला आहे तेव्हा तेव्हा तो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. त्याच टग्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

या मालिकेत बालकलाकार श्रीपाद पडवळ याने टग्याची भूमिका साकारली आहे.  श्रीपाद हा  केवळ 10 वर्षांचा आहे. टिग्या चौथीच्या वर्गात शिकत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यामधील घोणसरी गावचा श्रीपाद आहे. श्रीपादचे वडील कै संजय पडवळ इंजिनिअर होते. तसेच त्यांना गावचे प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून ओळखलं जात होत. वडिलांच्या पश्चात त्यांचा मुलगा श्रीपाद बालकलाकार म्हणून काम करत आहे. श्रीपाद सेंट उर्सुला शाळेमध्ये इयत्ता चौथीच्या वर्गात शिकत आहे. अभ्यास करत तो मालिकेत देखील काम करत आहे.

मालिकेत काम करण्यासाठी जेव्हा केव्हा श्रीपादला बोलावलं जात होते. तेव्हा तो मालिकेच्या सेटवर देखील अभ्यास करताना दिसला आहे. परंतु जेव्हा तो गावातून येतो तेव्हा श्रीपाद मालिकेतील कलाकारांसाठी गावातील काजू आणि आवळा भेट म्हणून आणतो. त्यामुळे मालिकेतील कलाकारांशी त्याचे चांगले नाते आहे. श्रीपादला बोलायला आवडते म्हणून तो सहकलाकार असो किंवा पार्श्व कलाकार असो सर्वांशी छान संवाद साधतो.

तो चिंगी म्हणजेच बालकलाकार साईशाला मालवणी बोलायला शिकवतो. सेटवरील त्याची वागणूक सर्वांना आवडते आणि म्हणूनच जेव्हा जेव्हा श्रीपाद सेटवर असतो तेव्हा तो वातावरण आनंदी करतो. टग्याच्या भूमिकेने श्रीपादला एक वेगळी ओळख मिळाली आहे. तसेच प्रेक्षक खूप उत्सहाने आबा, टग्या आणि आनंदी यांच्यातील मालवणी संवाद ऐकतात. ज्यामुळे या मालिकेचा एक मोठा चाहतावर्ग तयार झाला आहे.

त्यात भर म्हणून, आनंदी आणि राघव यांच्यातील केमिस्ट्री आणि मालिकेचे कथानक तसेच कलाकारांच्या आकर्षक हालचालींमुळे प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले जाते. ही या मालिकेची चांगली बाजू आहे. लवकरच नवा गडी नवं राज्य या मालिकेमध्ये एक सकारात्मक ट्विस्ट दाखवण्यात येणार आहे.

रमा आनंदीकडे राघव कायम खुश रहावा अशी व्यक्त करताना दिसणार आहे. यानंतर ती त्या दोघांमधून निघून जाणार आहे. या सगळ्यांमुळे आता आनंदी आणि राघवची  केमिस्ट्री पुन्हा पहिला मिळणार आहे. ज्यामुळे प्रेक्षक खूप आनंदी होऊन मालिका पाहताना दिसणार आहेत.

Leave a Comment