अभिषेक बच्चनच्या जन्मानंतर, बिग बींच्या या एका चुकीमुळे जाऊ शकत होती अनेक लोकांची नोकरी!

बॉलिवूडमधील बिग बी अर्थात अमिताभ बच्चन यांनी उत्कुष्ट अभिनयामुळे आणि आपल्या स्टाईलने प्रेक्षकांना भुरळ घातली. तसे तर ते लोकांना चुका न करण्याचा सल्ला देत असतात, परंतु तुम्हाला माहित आहे का की त्यांच्या एका चुकीमुळे अनेक लोकांची नोकरी जाऊ शकली जाऊ शकत होती.

तुम्हाला हि गोष्ट माहित नसेल की अभिषेक बच्चनच्या जन्मानंतर अमिताभ बच्चन यांनी आनंदाच्या भरात असे काम केले होते जे इतके चुकीचे होते की त्यामुळे अनेक लोकांची नोकरी जाऊ शकत होती. त्यावेळी बिग बींना त्यांच्या या चुकीचा अजिबात पश्चाताप झाला नव्हता, परंतु आज त्यांना या चुकीचा पश्चाताप होत आहे.

अमिताभ बच्चन यांनी एका मुलाखतीदरम्यान सांगितले की, अभिषेक बच्चनचा जन्म झाल्यावर डॉक्टरांनी त्यांना सांगितले की त्यांना मुलगा झाला आहे त्यावेळी त्यांनी आनंदाच्या भरात सर्व काही विसरून डॉक्टरांना आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या नर्सला वाईन पाजली.

त्यामुळे त्या डॉक्टर आणि नर्सची नोकरी जाऊ शकत होती. त्यांची कोणीतरी तक्रार केली होती की ड्युटीवर असताना त्यांनी दारू प्यायली होती.

हि गोष्ट अमिताभ बच्चन यांना समजताच ते तात्काळ हॉस्पिटलमध्ये गेले आणि लोकांशी संवाद साधला आणि त्यांची नोकरी वाचवली. अभिषेकचा जन्म झाल्यानंतर अमिताभ बच्चन इतके खुश झाले होते की त्यांना काय चूक काय बरोबर हे समजतच नव्हते. त्यांनी ड्रायव्हरपासून नोकरांपर्यंत प्रत्येकाला पैसे आणि मिठाई वाटली होती.

अमिताभ बच्चन यांना आता पश्चाताप होत आहे की त्यावेळी हॉस्पिटलचे नियम तोडायला नको पाहिजे होते आणि त्यांचे हे देखील म्हणणे आहे की कोणतेही नियम तोडणे हे चांगल्या नागरिकाचे लक्षण नसते.

Leave a Comment