कॉमेडिविश्वातील प्रसिद्ध अभिनेता राजू श्रीवास्तव यांचे नुकतेच निधन झाले आहे. त्यांच्या जाण्याने सगळ्या मनोरंजन विश्वात शोकाळ पसरला आहे. राजू श्रीवास्तव दीड महिना रुग्णालयात मृत्यूला मात देण्याचा पर्यंत करत होते. (After Raju Srivastava, another comedian passes away, know who is he)
परंतु अखेर ते अपयशी ठरले आणि त्याचा मृत्यू झाला. वाऱ्या सारखी त्यांच्या निधनाची बातमी सर्वत्र पसरली आणि सगळे दुखी होऊन पोस्ट करताना दिसत होते.
या दुःखातून मनोरंजन विश्व् बाहेर पडतंय न पडतंय तोवर आणखीन एका मृत्यूची बातमी समजली आहे. एका विनोदवीराचे निधन झाले आहे. हा विनोदवीर लाफ्टर चालेंजच्या पहिला सीजनमध्ये सर्वत्र झलकला होता. याबद्दलची सगळी माहिती प्रसिद्ध कॉमेडियन सुनील पाल यांनी सगळ्यांना दिली आहे.
एक दुखद बातमी टीव्ही इंडस्ट्रीमधून समजली आहे. दिग्गज कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांच्या निधनानंतर आता पुन्हा एकदा एका कॉमेडियनच्या निधनानंतर शोकाला पार्सली आहे. कॉमेडियन पराग कंसारा यांचे निधन झाले आहे. पराग कंसारा हे आपल्यला द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंजच्या पहिल्या सिझनमध्ये दिसले होते. पराग यांच्या निधनाची बातमी त्यांचे मित्र आणि पसिद्ध कॉमेडियन सुनील पाल यांनी एक व्हिडीओ पोस्ट करून दिली आहे.
गुजरात येथील वडोदरा येथे पराग कंसारा राहत होते. पराग अतिशय उत्तम अशे विनोदवीर होते. लाफ्टर चॅलेंजच्या पहिल्या सिझनमध्ये ते कंटेस्टेंट होते. परंतु गेल्या अनेक वर्षांपासून ते या क्षेत्रापासून दुरावले होते. अशी माहिती समोर आली आहे कि, काही दिवसापासून पराग यांच्यावर उपचार चालू होते. अश्यातच त्यांच्या निधनाची बातमी समोर आली आहे. मात्र ही बातमी प्रेक्षकांच्या आणि मनोरंजन क्षेत्राच्या मनाला चटका देणारी होती.
पराग कंसारा यांच्या निधनाआधी मोरंजन विश्वाने दीपेश भान, राजू श्रीवास्तव यांच्या सारख्या दिग्गज कलाकरांना गमावले आहे. पराग कंसारा यांच्या निधनानंतर सगळे खूप दुखी झाल्याचे दिसत आहे. मात्र त्यांच्या निधनानंतर अनेकांनी शोक व्यक्त केला आहे. लाफ्टर चॅलेंजच्या पहिल्या सिझनमध्ये पराग त्यांच्या चाहत्यांना दिसले होते. परंतु हा शो ते जिंकू शकले नाही. तरी देखील त्यांनी प्रेक्षकांच्या मनोरंजनामध्ये कोणती कमी केली नव्हती. यामुळे पराग खूप लोकप्रिय झाले होते.
अनेक चित्रपट आणि मालिकामधून पराग यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले होते. त्यांच्या कॉमेडी आणि त्याच्या टाईमिंगमुळे त्यांना ओळखले जात होती. पराग यांनी अनेक गुजराती मालिका आणि चित्रपटामध्ये काम केलं होत. असे ही म्हणले जात आहे कि, पराग यांच्या जाण्याने मनोरंजन क्षेत्रात एक वेगळी पोकळी निर्माण झाली आहे.