‘या’ गोष्टीला नाराज होऊन अभिनेते अमरीश पुरी यांनी ‘गंदी नाली का किडा’ म्हणत ‘या’ अभिनेत्याच्या लगावली होती कानाखाली ….

बॉलिवूडमध्ये अनेक खलनायकांनी स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. अभिनेते अमरीश पुरी यांनी बऱ्याच चित्रपटांमध्ये खलनायकाची भूमिका साकारली आहे. त्यांनी त्यांच्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली.

मोगेम्बो या नावाने प्रसिद्ध असलेले अभिनेते अमरीश पुरी यांना बॉलिवूडमधील टॉपचे खलनायक मानले जात असे. आज ते आपल्यामध्ये नाहीयेत परंतु ते आपल्या चित्रपटातुन अजूनही हयात असल्यासारखे वाटते.

अमरीश पुरी यांनी पॉजिटीव्ह भूमिका देखील केल्या परंतु ते जेव्हा खलनायकाची भूमिका साकारायचे तेव्हा सर्वांची घाबरगुंडी व्हायची. अमरीश पुरी यांनी शेरा या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यांना खरी ओळख ही खलनायकाच्या भूमिकेनेच मिळवून दिली.

पडद्यामागे अशा अनेक किस्स्यांमुळे ते चर्चेत आले. आज आपण त्यांचा असाच एक किस्सा जाणून घेणार आहोत. अमरीश पुरी यांनी चित्रपटाच्या सेटवर दिग्गज हिरोसोबत भांडण केले होते आणि त्यांची हालत खराब केली होती.

ते बॉलिवूडच्या एका सुपरस्टारला चुकीचे शब्द बोलले होते. एवढेच नाही तर असे देखील बोलले जाते की त्यांनी रागाच्या भरात त्या कलाकाराच्या कानशिलात लगावली होती. अमरीश पुरी हे ९०च्या दशकातील गोविंदावर संतापले होते.

अमरीश पुरी यांनी गोविंदाला रागाच्या भरात गंदी नाली का किडा असे म्हटले होते. त्यांनी गोविंदाच्या कानाखाली मारली होती. याचे कारण असे होते की गोविंदा रात्रीच्या वेळी शूटिंगला पोहोचला होता तर शूटिंगची वेळ सकाळची होती. यामुळे अमरीश पुरी गोविंदावर नाराज झाले होते. ते राग रोकु शकले नाहीत. एवढेच नाही तर त्यांनी रागाच्या भरात गोविंदाच्या श्रीमुखात लावली.

अमरीश पुरी यांच्यासोबत काम करणाऱ्या एका अभिनेत्याने सांगितले की ते नेहमी त्यांच्या सोबतच्या कलाकारांना चांगली वागणूक द्यायचे. त्यांनी त्यांच्या सफलतेवर कधीच घमंड केला नाही. अमरीश पुरी यांनी आपल्या ३५ वर्षांच्या करिअरमध्ये तब्बल ४०० चित्रपटांमध्ये काम केले होते.

त्यांनी अनेक हिट चित्रपटांत काम केले आहे. नायक, मिस्टर इंडिया, दामिनी, दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे, मुझसे शादी करोगी, घायल यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी उत्तम भूमिका बजावली आहे.

Leave a Comment